Pimpri : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपकडून लढले तर प्रचार करणार का? आढळराव म्हणाले..
पिंपरीत पत्रकारांशी बोलताना आढळराव म्हणाले, डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये येतात की नाही माहित नाही. त्यांची भाजपशी जवळीक वाढली असेल. कोल्हे भाजपमध्ये आले. तर, चांगली गोष्ट आहे. शिवसेना-भाजप युती वाढावी हीच आमची भूमिका आहे. मला काही अडचण नाही. पण, शिरुरची जागा शिवसेनेची आहे. भाजप नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हे यांची समजूत काढावी. त्यांना निवडणूक लढविण्यापासून थांबवावे. मी तर निवडणूक लढविण्यावर ठाम आहे.
भोसरीतील अनेक प्रश्न रखडले आहे. त्या प्रश्नांना गती देण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या आहेत. त्यामुळे भोसरीतील कामांना गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.