Talegaon : घरगुती वादातून मुलाने पेटवली शेतातील भाताची गंज

एमपीसी न्यूज – घरगुती वादातून मुलाने शेतातील भाताच्या पेंढ्या रचून ठेवलेली गंज पेटवून दिली. तसेच वडिलांना व भावांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 5) रात्री साडेसात वाजता आढे गावात घडला.

संभाजी चिंधू ठाकर (वय 41, रा. बेबडओहळ, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत चिंधू पंढरीनाथ ठाकर (वय 65, रा. ओझर्डे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी याने घरगुती वादातून शेतात भाताच्या पेंढ्या रचून ठेवलेली गंज पेटवून दिली. यामध्ये 15 ते 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर संभाजी याने वडील चिंधू यांच्या घरावर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या. वडिलांना शिवीगाळ करत वडिलांना आणि भावांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वडिलांनी मुलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.