World Cup 2023 : भारतीय संघाने रचला धावांचा डोंगर, श्रीलंकेपुढे 358 धावांचे लक्ष्य!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतरही हंगामी लंकन कर्णधार (World Cup 2023) मेंडीसने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याच्या घेतलेल्या अनाकलनीय निर्णयाचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय संघाने विक्रमी 300 हून अधिक धावांचा डोंगर रचत आणखी एका विजयाकडे दमदार पाऊल टाकले आहे.या विशाल धावसंख्येमुळे भारताने श्रीलंका संघापुढे 358 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली.जबरदस्त फॉर्मात असलेल्या कर्णधार रोहितला डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतावे लागले पण या धक्क्यातून सावरत गील आणि कोहलीने केलेल्या जबरदस्त भागीदारीमुळे भारतीय संघाने सामन्यात शानदार पुनरागमन केले.

दोघेही तुफानी पण अतिशय आकर्षक अंदाजात खेळत होते, त्यांच्या अनेक फटक्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.विक्रमवीर कोहली आज एक हजार धावा एका वर्षात पुन्हा एकदा पूर्ण करून आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला.

कोहलीला साथ देता देता कधी गीलने टॉप गीयर टाकला हे कळण्याआधीच त्याने विश्वकप स्पर्धेतला आपला सर्वोच्च स्कोअर (World Cup 2023) केला. दुसऱ्या बाजूने कोहलीही शानदार अंदाजात खेळत होता, दोघेही शतकाजवळ आले होते आणि ते शतके पूर्ण करतीलच असे वाटत असतानाच दोघेही तीन आकडी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरले नाही.

गील 92,तर कोहली 88 वर बाद झाले, पण तोवर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची विशाल भागीदारी रचली होती, पण या दोघांच्या विकेट्सनतंर अचानक भारतीय संघ सुस्थितीत असताना अडचणीत आलाय असे वाटायला लागले होते, त्यातच के एल राहूल,सुर्यकुमारही स्वस्तात बाद झाले, पण थँक्स 2 श्रेयस अय्यर,मागील सामन्यात खराब फटका मारून चौफेरटीकेला सामोरे जावे लागलेल्या श्रेयसने आज जबरदस्त मनोनिग्रहाचे शानदार प्रदर्शन करत एक अप्रतिम खेळी करुन भारतीय संघाला 300च्या पुढे आणून ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलला.

Pune : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या- रवींद्र धंगेकर

भारतीय डावातली दोन शतके हुकल्यानंतर किमान श्रेयस तरी आपले वैयक्तिक शतक आपल्या घरच्या मैदानावर पुर्ण करील असे वाटत असतानाच तो ही 82 धावांवर असताना संघहीत डोळ्यासमोर ठेवून खेळत असल्याने वैयक्तिक विक्रम पुर्ण करू शकला नाही, पण श्रेयस एक अप्रतिम खेळी करुनच बाद झाला हे नक्की!

भारतीय संघाने 2019 नंतर 18 वेळा 300 वा त्याहून अधिक धावा काढण्यात यशस्वी ठरला आहे.अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला पहिला आणि एकमेव संघ आहे.या पराक्रमामुळेच भारतीय संघाने आपल्या निर्धारित 50 षटकात 357 धावा ठोकल्या. या विशाल धावसंख्येकडे बघता भारतीय संघ आपल्या सलग सातव्या विजयाकडे अग्रेसर होत आहे हे जवळपास सिद्ध झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.