Sahitya Sammelan : 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार वर्ध्यात!

एमपीसी न्यूज : 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) जागा अखेर ठरली. यंदाचे हे संमेलन वर्धा येथे होणार असल्याचा निर्णय महामंडळाच्या नागपूर बैठकीत समंत झाला.  

शनिवार 28 मे रोजी महामंडळाची स्थळ निवड समिती वर्धा येथे जाऊन आली. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज वर्धा हे ठिकाण अंतिम ठरले. हे ठिकाण विदर्भ साहित्य संघाने सुचवले होते.

Manobodh by Priya Shende Part 47 : मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे

वर्धा येथील मैदान आणि वाहनतळाची (96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) पाहणी झाली असून ती जागा योग्य असल्याचे मत समितीने दिले. आणि त्यांच्या शिफारशीनुसार वर्धा हे ठिकाण अंतिम ठरले.  स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानात साहित्य संमेलन होणार असून अजून दिनांक ठरलेली नाही. परंतु, नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळात संमेलन घेण्याचे नियोजन होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.