Loksabha Election 2024 : आमच्या समस्या जाहीरनाम्यात घ्या; सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांची मागणी
एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून केलेल्या कामाची उजळणी करत भविष्यात केल्या जाणाऱ्या कामांची यादी जनतेसमोर मांडली जात आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी चाकण आणि खेड परिसरातील काही समस्या मांडल्या असून त्या समस्या आगामी निवडणुकांसाठी (Loksabha Election 2024) सामोरे जाणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
राजेश अग्रवाल यांनी मांडलेल्या समस्या –
नाशिक फाटा ते खेड रस्ता रुंदीकरण मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे, ते कधी होणार?
खेड भागात पुन्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ येणार का?
तळेगाव ते शिक्रापूर रस्ता रुंदीकरण पुढील पाच वर्षात होईल का?
चाकण, आंबेठाण चौकात उड्डाणपूल कधी होणार?
चाकण भागात महानगरपालिका येणार का?
चाकण भागात प्रत्येक घरात नळाने मुबलक पाणी कधी मिळणार?
रिंगरोडचे काम कधी सुरू होणार?
चाकण भागात गटारांचे जाळे कधी होणार?
चाकण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी तुम्ही काय काम करणार आहात?
चाकण, खेड भागातील नदी सुधारसाठी काही योजना आहे का?
खेड भागात मेट्रो कधी येणार?
पुणे नाशिक रेल्वेचे काम कधी सुरू होणार?
चाकण -खेड भागातील डी पी रस्ते कधी विकसित होणार?