Pune News पावसाचा फटका फळभाज्यांना; पालेभाज्यांची आवक घटली
एमपीसी न्यूज – पुणे जिल्हासह पुणे विभागात सुरू असलेल्या पावसाचा फटका फळभाज्यांना बसला आहे. पाऊसामुळे काढणी कमी झाल्यामुळे फळभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांदा, बटाटा, काकडी, हिरवी मिरची, टोमॅटो, मटारच्या भावात वाढ झाली आहे.
मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत, अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी रविवारी ( दि. 20 सप्टेंबर) दिली.
स्थानिक भागातून सातारी आलं 800 ते 900 पोती, टोमॅटो दीड ते दोन हजार पेटी, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, भुईमूग 100 ते 125 पोती, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, काकडी 7 ते 6 टेम्पो, मटार 50 ते 60 गोणी, कांदा 50 ट्रक, आग्रा, इंदौर आणि स्थानिक मिळून 35 ट्रक बटाट्याची आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : 270-340, बटाटा : 200-300, लसूण : 600-1200, आले : 150-300, भेंडी : 250-300, गवार : 350-500, टोमॅटो : 300-400, दोडका : 300-400, हिरवी मिरची : 300-450, दुधी भोपळा : 150-200, चवळी : 200-250, काकडी : 200-300, कारली : हिरवी 200-250, पांढरी 150-160, पापडी : 250-300, पडवळ : 200-220, फ्लॉवर : 150-200, कोबी : 100-160, वांगी : 200-250, डिंगरी : 200-250, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 250-300, तोंडली : कळी 250-300, जाड : 100-120, शेवगा : 500-700, गाजर : 150-200, वालवर : 300-350, बीट : 100-120, घेवडा : 300-400, कोहळा : 100-120, आर्वी : 200, घोसावळे : 160-200, ढेमसे : 200-220, पावटा : 300-350, भुईमूग शेंग : 400-450, मटार : 1400-1500, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, मका कणीस : 60-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.
मागणीमुळे कांदापात आणि पालकच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 8 रुपयांनी, तर करडई व कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे 4 आणि 3 रुपये, शेपू, चाकवत, चुकाच्या भावात प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती विलास भुजबळ यांनी रविवारी (दि. 20 सप्टेंबर) दिली.
मुळ्याच्या भावात जुडीमागे 13 रुपयांनी आणि राजगिराच्या भावात 4 रुपयांनी घसरण झाली आहे. मागाणी व पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
कोथिंबीर : 500-1500, मेथी : 1200-1800, शेपू : 500-1000, कांदापात : 1400-2000, चाकवत : 500-600, करडई : 800-1000, पुदिना : 300-600, अंबाडी : 500-800, मुळे : 800-1200, राजगिरा : 500-600, चुका : 1000-1200, चवळई : 800-1300, पालक : 1500-2000.
डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बाजारात सुमारे 70 टक्के डाळिंब हलक्या दर्जाचे येत आहे. त्यामुळे दर्जेदार डाळिंबास चांगला भाव मिळत आहे. अन्य सर्व फळांची आवक जावक कायम असून भाव स्थिर आहेत.
लिंबं (प्रति गोणी) : 300-400, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 120-280, (4 डझन ) : 30-100, संत्रा : (3 डझन) : 100-250, (4 डझन ) : 30-100, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 40-110, गणेश : 40-60, आरक्ता 20-50. कलिंगड : 5-20, खरबुज : 10-30, पपई : 5-20, चिक्कू : 100-700, पेरू : 300-450, सिताफळ 10-120.