Alandi News : आळंदी व लगतच्या ग्रामीण भागातून हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद
एमपीसी न्यूज – येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन असून देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामुळे सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे.त्याला प्रतिसाद देत, आज 13 ऑगस्ट रोजी आळंदी शहर व शहरालगत असणाऱ्या ग्रामीण परिसरातील काही विविध भागातून उत्स्फूर्तपणे घरा घरांवर नागरिकांकडून तिरंगा ध्वज लावण्यात आले होते.
डोंगर वस्तीवर म्हणजे हनुमानवाडी येथील ठाकर वस्तीवरील घरांवरती ही तिरंगा ध्वज लावण्यात आले होते. तसेच आळंदी व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांनी सोशल मीडियावर घरावरती तिरंगा ध्वज लावलेले फोटो पोस्ट करून शेअर केले होते.