Vasant More : वसंत मोरे यांचे आता शिंदे सरकारला चॅलेंज, म्हणाले हिम्मत असेल तर…
एमपीसी न्यूज – मनसेचे नेते वसंत मोरे यांनी एक ट्विट करून आता फडणवीस आणि शिंदे सरकारला चॅलेंज दिले आहे. हिम्मत असेल तर महापौरसुद्धा जनतेतून निवडा असं त्यांनी चॅलेंज दिला आहे. तुम्ही कितीही ताकद लावा पुण्याचा महापौर फक्त मनसेचाच होणार असं देखील ते म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर पहिलाच निर्णय त्यांनी आरे कारशेड संदर्भात घेतला. त्यामुळे ठाकरे सरकारने घेतलेले सर्वच निर्णय मोडीत निघणार का अशी चर्चा होत असतानाच वसंत मोरे (Vasant More) यांनी केलेले हे ट्विट आता चर्चेत आहे.