Maharashtra Corona Update : कोरोनामुळे राज्यात 50 हजार रुग्णांचा मृत्यू, मृत्यूदर 2.54 टक्के
एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्या पासून आजपर्यंत तब्बल 50 हजार 27 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 57 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात राज्यात 3 हजार 581 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 65 हजार 556 एवढी झाली आहे.
त्यापैकी 18 लाख 61 हजार 400 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 52 हजार 960 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra reports 3581 new #COVID19 cases, 2401 discharges and 57 deaths today.
Total cases 19,65,556
Total recoveries 18,61,400
Death toll 50,027Active cases 52,960 pic.twitter.com/g6tas3xo8z
— ANI (@ANI) January 9, 2021
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.70 टक्के एवढं झाले आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 33 लाख 38 हजार 488 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 19 लाख 65 हजार 556 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 34 हजार 545 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 474 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना नागरिकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांचं लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.