Charholi Crime News : नळ कनेक्शन वरुन दोन गटात वाद, परस्पर विरोधी गुन्हा दाखल ; पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज – नळ कनेक्शन घेण्यावरून दोन गटात मोठा वाद होऊन, मारामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पाच जण अटकेत आहेत. कोतवालवाडी, शिवाजी महाराज चौक, चर्होली बु. येथे रविवारी (दि.13) ही घटना घडली.

एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एक महिला, हरीभाऊ महादु थोरवे, सोमनाथ दत्तात्रय थोरवे, स्वप्निल ज्ञानेश्वर थोरवे, श्रेयस संदिप थोरवे, स्वराज संदिप थोरवे, कार्तिक अशोक थोरवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, भाडेकरू काका पुर्णनाव पत्ता माहीत नाही, संदिप हरीभाऊ थोरवे, समीर हरीभाऊ थोरवे, समीर दळवी पुर्णनाव माहीत नाही या चार जणांना अटक केली आहे.

याच्या परस्पर विरोधात एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून दत्तात्रय प्रभाकर नलावडे (वय 50, रा कोतवालवाडी, च-होली) याला अटक केली असून, पाच महिला व 3 ते 4 अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नळ कनेक्शन घेण्यावरून दोन गटात वाद झाला, वाद विकोपाला गेल्यानंतर गटात किरकोळ मारहाण झाली. याप्रकरणी पाच जण अटकेत आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.