India Corona Update : 69.09 लाख रुग्णापैकी 59.06 लाख झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 85.51 टक्के
एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची वाढ काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मागच्या महिन्यात दररोज 90 हजारांहून अधिक रुग्ण वाढ होत असताना या महिन्यात ती 60 ते 70 हजारांच्या घरात आहे. याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
देशात आजवर नोंद झालेल्या 69.09 लाख रुग्णापैकी 59.06 लाख झाले कोरोनामुक्त झाले असून देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.51 टक्के एवढे झाले आहे.
मागील 24 तासांत देशभरात 70,496 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 69 लाख 06 हजार 152 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 06 हजार 070 एवढे रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 8 लाख 93 हजार 592 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.
India's #COVID19 tally crosses 69-lakh mark with a spike of 70,496 new cases & 964 deaths reported in the last 24 hours.
Total case tally stands at 69,06,152 including 8,93,592 active cases, 59,06,070 cured/discharged/migrated cases & 1,06,490 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/4TlKC5qEZh
— ANI (@ANI) October 9, 2020
मागील 24 तासांत देशभरात 964 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. आत्तापर्यंत देशात 1 लाख 06 हजार 490 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृत्यूदर 1.54 टक्के एवढा आहे. दिलासादायक बाब म्हणजे नव्यानं वाढ होणा-या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात मागील 24 तासांत 78 हजार 365 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.51 टक्के एवढे झाले आहे.
देशात आतापर्यंत 8 कोटी 46 लाख 34 हजार 680 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 11 लाख 68 हजार 705 चाचण्या या गुरुवारी (दि.8) करण्यात आलेल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली.
COVID-19 Testing Update. For more details visit: https://t.co/dI1pqvXAsZ @MoHFW_INDIA @DeptHealthRes #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 pic.twitter.com/G4v7Xs1hy7
— ICMR (@ICMRDELHI) October 9, 2020
देशात 7 ऑगस्टला कोरोना रुग्णांचा 20 लाखांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर 23 ऑगस्टला 30 लाख झाले, 5 सप्टेंबर 40 लाख, 16 सप्टेंबर 50 लाख तर 28 सप्टेंबरला देशात कोरोना रुग्णांची 60 लाख एवढी संख्या झाली. भारत जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला अमेरिकेनंतर दुसरा देश आहे.