Pune : कामगारहिताचे कायदे पुन्हा प्रस्थापित करून कामगार क्षेत्रास न्याय मिळवून देण्याची काँग्रेसची भूमिका
काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचे विधान
एमपीसी न्यूज – ब्रिटीश गुलामीत पिचत पडलेल्या भारताचे, स्वातंत्र्यलढ्याद्वारे ‘लोकशाहीरुपी देशात रुपांतर’ हे काँग्रेस’नेच् केले. समानता, न्याय व सर्वांगीण प्रगतीची कवाडे देशात उघडली गेली असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते गोपाळ तिवारी(Pune) यांनी केले.
देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असताना देशातील मोदी सरकारने उद्योगपती मित्रांसाठी भांडवलशाही धार्जिणे भूमिका घेऊन कामगारहिताचे 29 कायदे रद्द केले. त्यामुळे कामगार देशोधडीला लागले व असुरक्षिततेच्या गर्तेत अडकले. देशातील कामगारांप्रती झालेला अन्याय भरुन काढण्यासाठी,2024 च्या निवडणुकीनंतर कामगार हिताचे कायदे पुनर्पस्थापित करून’ कामगार क्षेत्रास न्याय मिळवून देण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी(Pune) यांनी सांगितले.
काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीचे पुणे शहर लोकसभेचे ऊमेदवार रविंद्र घंगेकर यांनी काल(1 मे) रोजी अर्थात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शिवाजी नगर येथील देशातील श्रमिकांचे प्रतीक असलेल्या कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमात गोपाळ तिवारी बोलत होते. उपस्थित मान्यवरांनी “महराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या” नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी आमदार दीप्तीताई चौधरी, लीगल विभागाचे प्रदेश सचिव ऍड. फैयाज शेख, भाऊ गोरावडे, मयूर काळेल, सतीश चव्हाण, राजेश मांजरे, रमण पवार, धीरज खोरे, ऋग्वेदी सपकाळ, सुभाष काळे,अविनाश बहिरट, विकास शिरोळे, अरविंद कांबळे, सुरेश नांगरे, शेखर जाधव, अण्णा काळेल इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.