Pune Crime News : लग्नानंतरही प्रेमसंबंध असल्याचा संशय, दुचाकीने पाठलाग करून तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज –  मुलीचे लग्न झाल्यानंतरही तिच्याशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बारामती तालुक्यातील मुरूम गावात रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वैभव दीपक खरात, हर्षद थोरात, सनी खुडे या तिघांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज नारायण सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आदित्य याचे एका मुली सोबत मागील तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. ही मुलगी त्यांच्या नात्यातील होती. प्रेम संबंधाच्या कारणावरून फिर्यादीचा मुलगा आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद देखील झाला होता. परंतु नातेवाईक असल्यामुळे सामंजस्याने हा वाद मिटविण्यात आला होता.

दरम्यान काही महिन्यांपूर्वीच यातील मुलीचे लग्न झाले होते. परंतु आदित्य त्या मुलीसोबत फोनवरून बोलत असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून आरोपींनी रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सोमेश्वर कारखाना ते मुरूम रस्त्यावर आदित्य त्याचा पाठलाग केला. त्याची दुचाकी अडवून ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये डोक्यात चेहर्‍यावर आणि पोटावर वार झाल्याने आदित्य हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.