Vinod Suryawanshi : अण्णाभाऊंच्या लेखणीत कष्टकऱ्यांचे खरे प्रतिबिंब

एमपीसी न्यूज –  लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून लेखणीतून शोषित, पीडित, दलित, कष्टकरी कामगारांचे जीवन जगासमोर आणले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासह अण्णाभाऊंच्यां सर्व  कादंबरी, जितकी पुस्तके आहेत. त्यामध्ये कष्टकरी कामगारांचे खरे प्रतिबिंब आणि यातला नायक हा खरा आहे तो कल्पनेतला नाही, असे मत प्रा. विनोद सूर्यवंशी (Vinod Suryawanshi) यांनी व्यक्त केले.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कष्टकरी श्रमिकांचा हुंकार – अण्णाभाऊ या विषयावर  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते. यावेळी प्रसिद्ध कवी व लेखक आसाराम कसबे, सोशल मीडिया प्रमुख उमेश डोर्ले, महिला प्रमुख माधुरी जलमुलवार, सुरेश देडे, तुकाराम माने, निरंजन लोखंडे, जरीतास वाठोरे, सुनंदा आठवले, सुनीता पोतदार, नंदा तेलगोटे, नर्मदा दराडे, हेमा राठोड, आबा शेलार, सुभाष निचले, रसूल शेख, आम्रपाली शिंगे, रमेश सोनटक्के, राजश्री बडोरे, लता कांबळे आदी उपस्थित होते.

उपस्थित कष्टकरी कामगार व पाहुण्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आसाराम कसबे यांच्या ‘अण्णाभाऊंच्या कार्याची साक्ष देई सह्याद्री कडा, पेटविला धडधडा संयुक्त महाराष्ट्राचा लढा’ हि शाहिरी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Pimpri MIM: पिंपरीत एमआयएच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

प्रा. सूर्यवंशी म्हणाले की, आण्णाभाऊ समोर अनेक पर्याय असताना त्यांनी साम्यवाद स्वीकारला व मानव हिताची कामे केले.  कम्युनिजमद्वारे श्रीपाद डांगे यांच्यासोबतही काम केले. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणुसकी टिकवण्याचं मानवता पण जपण्याचं काम अण्णाभाऊ यांनी केले. जगात तीन सत्य टिकत असतात. त्यामध्ये निसर्ग, संगीत, आणि साहित्य यामध्ये साहित्य हे अण्णाभाऊंनी  काष्टकरी वर्गाचे अजरामर केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज ही कष्टकरी कामगारांना झगडावे लागते हे वेदनादायक आहे. अण्णाभाऊंची पात्रे ही श्रमिक कामगारांचे खरे  प्रतिबिंब आहेत. मोरारजी देसाई सरकारने तमाशा माध्यमावर बंदी आणल्यानंतर माझी मुंबईद्वारे लोकनाट्य सुरू केले आणि शिवरायाच्या प्रतिमा पूजनाने समाजामध्ये प्रबोधन केले. आश्चर्य म्हणजे दोनशे पेक्षा अधिक प्रयोग मोठ्या प्रतिसादाने यशस्वी केले. अण्णाभाऊ लिखित सोळा कादंबरी या स्त्रीप्रधान आहेत. महिलांना अग्रस्थान देऊन महिलांना मानाचे स्थान देणारे अण्णाभाऊ होते हे विसरता कामा नये असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक माधुरी जलमुलवार, सूत्रसंचालन माया चिमणे यांनी तर आभार फरीद शेख यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.