Maval News : कासारसाई धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 3) घडली.

शशांक सिंह (वय 19), रवीकुमार विनोदकुमार (वय 19, दोघे रा. आकुर्डी. मूळ रा. बिहार) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक आणि रवीकुमार हे त्यांच्या चार मित्रांसोबत गुरुवारी कासारसाई धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. धरणाच्या कडेला उभे असताना त्यातील तिघेजण पाय घसरून पाण्यात पडले. त्यातील एकाला मित्रांनी बाहेर काढले, मात्र शशांक आणि रवीकुमार हे दोघे पाण्यात बुडाले. दरम्यान या दोघांचे मृतदेह पोलिसांनी पाण्याबाहेर काढले आहेत.

शशांक आणि रविकुमार हे दोघेही आकुर्डी येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षात शिक्षण घेत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.