Pune News : लग्नानंतर माहेरी जाण्यास व फोनवर बोलू देण्यास विरोध केल्याने नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : लग्नानंतर सासरच्या मंडळींनी माहेरी जाण्यास व फोनवर बोलू देण्यास विरोध केल्याने 18 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुरसुंगी येथील शिवतेजनगरमध्ये हा प्रकार घडला. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश उर्फ सुमित तुकाराम तमांचे (वय 25), तुकाराम अजिनाथ तमांचे (वय 47) आणि संगीता तुकाराम तमांचे (वय 40) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणी मयत मुलीचे वडील हनुमंत किसन डोरले (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर 2020 मध्ये सायली तमांचे हिचे आकाश तमांचे त्याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपीने तिला वेळोवेळी त्रास देऊन किरकोळ कारणावरून भांडण करत असत. तसेच तिला माहेरी जाण्यास व फोन करण्यास विरोध करत होते. यामुळे सायलीने फुरसुंगी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी पती आणि सासू-सासरे यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.