Talawade News : पाणी भरण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून वाद झाला, या वादात महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. साई कृपा हौसिंग सोसायटी, सहयोगनगर, तळवडे येथे रविवारी (दि.20) सायंकाळी 5.30 वा. ही घटना घडली.

विजय नागनाथ दाखले (वय 32), एक महिला आणि सत्यवान दाखले या तीन जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने सोमवारी (दि.21) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी साईकृपा हौसिंग सोसायटी, तळवडे येथे भाडोत्री म्हणून रहायला असून, एकमेकांचे शेजारी आहेत. फिर्यादी महिला नळावर पाणी भरण्यासाठी गेले असता, आरोपी महिलेने त्यांच्या घरात प्रवेश करून तु पाणी का भरते, तुमच्यामुळे मला पाणी भेटत नाही असे बोलून, घराबाहेर ओढत घेऊन गेले. आरोपीने विजय दाखले याने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. फिर्यादीला मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.